Skip to main content

Posts

भावनिक जाळ्यातून बाहेर येणं गरजेचं !

 आपल्याच आपल्या स्वार्थी परिघात ती मोजकीच 'आपली' माणसं असतात, ज्यांच्या सुखदुःखात आपला 'स्वार्थ' असतो - समाधानाचा. ज्यांच्या आणि आपल्या मध्ये 'अंतर' असतं स्नेहाने भरलेलं, जेवढं 'अंतर' जास्त, तेवढा स्नेह जास्त.        आपली माणसं सतत आपल्या आसपास असतात, तेव्हा अनेकदा ती कंटाळवाणी वाटतात, कारण मानवी मनालाच काय, निसर्गाला सुद्धा 'बदल' हवा असतो. हे स्वाभाविक आहे. एखाद्या गोष्टींचं महत्व किंवा गरज समजावून घ्यायला काही दिवस तिला अलिप्त ठेवावं लागतं. मग उमजतं त्या गोष्टींचं मूल्य. ते कायम जास्तच असावं हा हट्ट मुर्खपणाचा. ते कमी सुद्धा का नसायला हवं ? वरती उल्लेख केला तसं आपल्या परिघात नकळत 'आपल्या' बनून गेलेल्या व्यक्ती या आपल्या बाजूने 'आपल्या बनलेल्या' आहेत ! समोरून तशीच परिस्थिती असेल असं गृहीत धरू नये कारण - 'व्यक्तिस्वातंत्र्य' आपल्या परिघातली माणसं निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो आणि त्याचा आदर करणं आपल्याला भाग पडतं. इथे 'अपेक्षा ठेवू नका' वगैरे हळवेपणा आणण्याची गरज नाही. जे आहे ते सुरळीत चालू असतं, तुमच्यासाठी स...
Recent posts

पिशी - भन्नाट प्रवासातील मजेदार किस्से - २

यापूर्वीचा भाग - १ इथे वाचा          आता गाडी बेलवंडी फाट्याच्या पुढं निघाली. पुणे नगर हायवेनी. चाकं पाण्याने काळी चकाचक झालेली. चर्रर्रर्र आवाज करत पाणी उडवत होती. तसंही गाडीचा वर्षभराचा इटाळ पावसाने भिजल्याशिवाय निघत नाही. हे म्हणजे गाडीचं अभ्यंगस्नान. हायवे असला तरी आपल्या डाव्या साईडला इथून तिथून पाणी साचलेलं. ते पाणी जास्त असेल तर तंगड्या वर करणे. गाडीच्या उजेडात पुढं फूटभरच दिसत होतं. पावसाची सर कंटूनी चालूच. सोबत हवेचे झपके येत होते. वाडेगव्हाण गेलं, गोळीबार फाटा गेला. पुढं चिंभळ्याचा डोंगर सोडा, मागून आलेली गाडी रापक्यास पाणी उडवल्याशिवाय दिसत नव्हती. गाडी घाटाला लागली. तवर आमची बॉडी पूर्ण भिजलेली नव्हती. बॉडी भिजणं महत्वाचं नसतंय पावसात. अंडरप्यांटीत पाणी शिरणं सफिशियंट असतं. तोपर्यंत कसला बी अंटू फंटू पावसात भिजतो. एकदा का अंडरप्यांटीत पाणी शिरलं, की विषय खल्लास. तुम्ही इंस्टाला फोटोमागं कितिबी KGF चं रॉकिंग टाईप music टाकत असाल, पण पावसात आतमध्ये पाणी शिरल्यावर तिथून पुढं तुमची खरी मंजिल, ध्येय, चिकाटी, लाथ मारीन तिथं पाणी काढीन वगैरे सगळा खेळ सुरू हो...

पिशी - भन्नाट प्रवासातील मजेदार किस्से - १

        नोहेंबर महिना असेल. कोरोना यायच्या आदलं वर्ष. दिवाळीची सुट्टी संपली नव्हती पण तेजस सरांचा व्हिडीओ प्रोजेक्ट सुरू करायचा होता, इलेक्शन जवळ आले होते. माऊल्या म्हणजे Ajinkya Dandawate  निवेदक आणि मी एडिटर असं सुसल्याने (आम आदमी Sushilkumar Shivaji Shelke ) आम्हाला तयार केलं होतं.  पावसाळ्याचे दिवस, त्यामुळं आमच्या सवयीप्रमाणे नगरला निघायच्या आधी आम्ही फुल तयारीत. मोबाईलला शेपरेट प्लास्टिकची पिशवी. आम्हाला कायम लागतात त्यामुळं माऊल्या ने कुठूनतरी चान्स मारून माझ्याकडं जपून ठेवल्या होत्या पावसाळ्या साठी. निघायची वेळ कोणती तर संध्याकाळी, पावसाच्या मोक्यावर. रूमवर जायचं सगळं सामान (वस्तू या अर्थाने) एका बाचक्यात भरलं, ते पण भिजनार नाही अशी सोय केलती. माऊल्या घरी माझ्यापर्यंत आला. तेवढ्यात सुसल्याचा फोन - येताना 'पिशी' घेऊन ये. म्हटलं आणतो ! पिशवी नेणं म्हणजे एवढं काय अवघड काम नाही. पण त्याची ती 'पिशी' त्याच्या घरून, शेळकवाडी वरून न्यायची होती. गाडी निघाली दैठण - मेखणी मार्गे शेळकवाडीकडं. वाघमारे वस्तीच्या माथ्यावर गेलो तं ह्ये काळंझ्यार आभाळ आत्ता कोसळंल अ...

प्रासंगिक - माझी पहिली मैत्रीण

जागतिक सायकल दिनानिमित्त... माझी पहिली मैत्रीण "कितीची हे रं गण्या सायकल ?" "२४ ची" "नाहीये अय, काही पण फुसक्या बाता हानतंय त्ये" "खरंच २४ ची हे, आमछे आबा म्हणले. तुला काय माहीत रं बंट्या ?" "पयली २२ चीच तुला मधून येत होती, ख्यळून दाखव बरं ही शिटाव बसून" "हा मंग ? येती मला वरून, मी नाय दाखवणार चालून तुम्हाला"      असं म्हणत गण्याने सायकलच्या नळीखालून पाय घालत एक दोन अर्धवट पॅंडल मारले आणि सायकल चालती केली. रस्त्याच्या पांढऱ्या फुफाट्यात नव्या टायरची नक्षी स्पष्ट उमटवत गेलेली कोरी करकरतीत सायकल पोरं न्याहाळत उभे राहिले.       हा प्रसंग आम्ही साधारण ४ थी - ५ वी त असतानाचा. साठलेल्या पाण्याच्या डबक्यात सायकल स्टँडवरती आडवी करून फवारे उडवणे, जोरात पळवत नेत फर्रकन लांबलचक ब्रेक मारणे, दोन्ही हात सोडून सायकल पळवणे, वेगात सायकल नेऊन दोन्ही पाय कॅरेजवरती ठेवून स्टंटबाजी आणि बरेच काय काय उद्योग आमचे. वस्तीवरची ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा झाली की ५ वीला गावात सायकलवर शाळेत जाणं आमचं स्वप्नं असायचं. ४ थी पर्यंत त...

प्रासंगिक - आपण कुठवर पोचलो ?

आपण कुठवर पोचलो ?        पृथ्वीवर आपण किती छोटे आहोत यापेक्षा या ब्रह्मांडात आपण इवलेसे जीव सुद्धा नाहीत हे सत्य आहे. इतर प्राण्यांप्रमाणेच माणूस, फक्त त्याला बुद्धि जास्त.         त्याने हे सगळं तयार केलं या बुद्धीच्या जोरावर. बुद्धी सोडून सगळ्या माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये काही फरक नाही. खाणे, पिणे, पचवणे, संभोग, मुलांना जन्म देणे, म्हातारे होणे आणि मरून जाणे. प्रत्येक प्राण्याला या सर्व गोष्टी आणि सोबत भावनाही असतात. आपले जोडीदार सुद्धा ! तसे माणसांनाही आहेत. फरक इतकाच, त्याने या नात्यांना नावं दिली, आणि कोणत्या नात्यातल्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं पाहिजे हे मापदंड ठरत गेले. त्यानुसार कोणतं वागणं नैतिक आणि कोणतं अनैतिक याच्या व्याख्या बनत गेल्या आणि हे नात्याचं प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनत गेलं.          पक्षी, प्राण्यांची आई पिलाला जन्म देते. त्याच्या पंखात, पायात बळ येईपर्यंत, त्याला स्वतःची अन्नाची गरज भागवता येईल, इथपर्यंत ते आपल्या जीवनाचा कितीतरी भाग खर्च करत असावेत. नंतर ते त्याला सोडून दिल्य...

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

सरकारी कामासारखी लांबलेली झोप 😴

                   बेंचवर बसल्या बसल्या झोपणारा माणूस मी.. एखादे दिवस असंच होतं राव !                               ऑफिसवरून यायला उशीर झाला, खाता-पिता, whp चा पसारा आवरता आवरता उशीर झाला ! हात्तीच्या ! मध्यरात्रीचे २ वाजले 🤔 पुस्तक वाचता वाचता झोपू.. २ वाजून तीस मिनिटं ? आता झोपलंच पाहिजे ब्वा !  Light बंद, झोपलो.  म्हटलं झंडू बाम लावू म्हणजे सर्दी नाही होणार, उठलो, बाम लावलं  थोडा वेळ डोळे मिटून.. आज उशी थोडी मोठी वाटतेय, काढून ठेवावी का ? नको झोपच आता .. सकाळपर्यंत मान अवघडली तर ? काढूनच ठेऊ उशी, काढली मग झोपलो आत्मचिंतन करू दिवसभराचं, म्हणजे झोप लागणार  जर्किन ची गरज नाही आज, थंडी नाहीच मुळात..   पहाटे थंडी पडेल, राहू देऊ झोप नाही लागत, जर्किन मुळेच ! उठलो, ठेवलं काढून  झोपलो, झोप लागली  कुत्र्याचं बारीक पिल्लू, दारासमोर येऊन भु...