Skip to main content

प्रासंगिक - २ स्वयंसेवक

*स्वयंसेवक

(२४/०९/२०१७)




     सामर्थ्यशाली विचारांचं भव्य भांडार आणि त्या विचारांना दिलेली कृतीची जोड यांचा संयुगरित्या मेळ घालण्याची धमक युवक बुद्धीमधे असते. अश्याच काहीशा विचारधारेतून उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्राने पाहिलेल्या स्वप्नाला साकारण्यासाठी महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षाचा मुहूर्त साधून एका विशाल योजनेला तरूणांच्या झगझगत्या मशाल देत शुभारंभ झाला. 

    पावसाचा एक एक थेंब आणि या थेंबातून तळे, तळ्यातून झरा आणि या झर्याची नदीला समुद्रास रूपांतर करण्यास मिळालेली उमेद, याच उमेदीने आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या लाखो ,हजारो  तरूण तरूणींच्या खांद्यावर ताठ मानेने उभी आहे. वैयक्तिक आयुष्य जगताना समाजात असलेले आपले अस्तित्व समाजाच्या विचारांशी जोडलेली नाळ, त्यांच्या समस्या समजावून घेत , समाजाला योग्य मार्गाने नेण्याचा यशस्वी प्रयत्न रा.से.यो. चे स्वयंसेवक आजही पार पाडताहेत. तालमीतील मातीत कणखर परिश्रम आणि डावपेच टाकण्यात पटाईत घडलेला पहिलवान जसा समोरून येणार्या प्रत्येक डावाला चितपट करण्याची क्षमता ठेवतो ,अगदी असंच रा.से.यो. मधे घडलेला प्रत्येक हिरा भावी नागरिकत्व , पालकत्व असो किंवा नेतृत्व असो, त्यांना कुठल्याही वादळाची तमा नसते. या स्वयंसेवकांना मर्यागा असते ती फक्त आभाळाचीच. आयुष्यभराची शिदोरी दोन वर्षात घेता घेता या स्वयंसेवकांच्या दोन पिढ्यांना पुरतील असे संस्कार आणि जाणीवा अनुभवायला आणि शिकायला मिळतात. आणि मग धरणातून प्रचंड इच्छाशक्तीने वाहिलेला पाण्याचा लोट ज्याप्रमाणे वाट सापडेल त्या दिशेने आपला मार्ग कापत जातो तो त्याच्या ध्येयाकडे अगदी तसाच नितळ आणि अविरत इच्छाशक्तीने रा.से.यो. चा युवक समाजात वावरत असतो.

         *_हम उठें,उठेगा जग हमारे संग साथियो,_*
        *_हम बढे तो सब बढेंगे अपने आप साथियों..._*

या आपल्या गीतातील ओळींना आपल्या जीवनाचा भाग बनवून जगण्याची प्रेरणा आणि,


       *_सशक्त मजबूत, अशा या खांद्यावरती 
आव्हान तु पेलून घे ना..._*

बिल्ला,आव्हान -२०१६
आव्हान शिबीरात प्रशिक्षण देणारी
5 th BN NDRF Team , पुणे
असं आवाहन करणार्या रा.से.यो.चा स्वयंसेवक जगण्यासाठी आणि लढण्यासाठी या स्वबळ आणि प्रबळ भारताचं स्वप्नं उरी घेउन हरएक प्रतिकूल परिस्थितीतही सज्ज असतो. 
    ४८ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या नवयूग मोहिमेत दरवर्षी लाखो युवक युवती स्वत:मधे नेतृत्वगुण , वक्तृत्वगुण, आणि समाजाचं काही तरी देणं असल्याची जाणीव दोन वर्षात प्राप्त करून आयुष्यभर कर्तृत्व गाजवतात. _धूळ खात पडलेल्या काळ्याकूट्ट दगडाची सुरेख सुंदर मुर्ती कशी बनू शकते याची कैक उदाहरणं मी रा.से.यो.च्या दोन वर्षात स्वत: अनुभवलीत._ स्वत:मधे असलेली प्रचंड ताकद, सामर्थ्य ओळखायला शिकवलं ते रा.से.योजनेनेच. आई- बाबांनंतर आयुष्य जगण्याचं प्रशिक्षण कुठं मिळत असेल तर ते रा.से.यो. च्या माध्यमातूनच मिळेल हे मी प्रत्येक युवक मित्राला सांगायला विसरणार नाही. अनेकवेळा तर मी एका प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता थकून जातो की मला रा. से.यो. मधे  मला काय मिळालं नाही ?? एखादा स्वयंसेवक रा.से.यो. म्हणजे काय हे शब्दात सांगू  शकत नाही, त्यासाठी स्वत: स्वयंसेवक होऊन अनूभवावं लागेल,तरच समजू शकतं रा. से.यो. काय आहे ते. आजच्या घडीला स्वयंसेवी संस्थांमार्फत जे काम राष्ट्रात होत नसेल, ते काम संघटीतपणे करण्याची धमक रा.से.यो. च्या स्वयंसेवकांमधे आहे आणि हे कित्येकवेळा हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवूनही दिलंय. दरवर्षी प्रत्येक क्षेत्रामधे प्रचंड प्रमाणात यशस्वी कार्ये रा.से.यो.कडून घडताहेत. मग ते साहित्यापासून ते कलाकारीतेपर्यंत, जनतेच्या प्रबोधनापासून ते जीवित संरक्षणापर्यंत, राष्ट्राच्या ग्रामिण समस्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तराच्या समस्यांपर्यंतचे कार्य आजतागायत रा.से.यो. कडून घडतंय.


      शिरूरच्या *चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय*ात शिकताना _सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या_  रा.से.यो. चा स्वयंसेवक आणि प्रतिनीधी म्हणून काम करताना मिळालेले अनूभव माझ्या प्रत्येक क्षणाच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे. याच काळात विद्यापीठाचे माजी कुलगूरू मा.डॉ.श्री.वासूदेव गाडे सर, रा.से.यो. चे संचालक प्रा.डॉ.संजयकुमार दळवी सर, सध्याचे कुलगूरू मा.श्री.डॉ.नितीन करमळकर सर आणि रा.से.यो.चे संचालक प्रा.डॉ. प्रभाकर देसाई सर या हस्तींचं मार्गदर्शन आणि विचार लाभले.
 सी.टी.बोरातील कार्यक्रम अधिकारी असतील तसेच रा.से.यो.च्याच टाक्याने घडलेल्या काही प्रेरणादायी मूर्त्या , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त औरंगाबाद विद्यापीठाचे भावलेले व्यक्तिमत्व मा.डॉ.राजेश करपे सर, इंदापूर कॉलेजचे राष्टीय इंदिरा गांधी पुरस्कार सन्मानीत प्राचार्य डॉ.संजय चाकणे सर , नुकतंच राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कृत संगमनेर कॉलेजचे डॉ.फलफले सर, डॉ.भगवान माळी सर( टी.सी कॉलेज,बारामती) अशा आणि इतर अनेक व्यक्तिमत्वांच्या सहवासाने, आणि प्रेरणेने एक वेगळा दृष्टिकोण प्राप्त झाला. *राज्यभरात रा.से.यो. च्या ज्योतीने प्रज्वलित आपापल्या क्षेत्रात यशस्वी काम करणारे जीवाभावाचे स्वयंसेवक मित्रसहकारी भांडार* फक्त रा.से.यो. मुळेच मिळू शकले.

   आयुष्यभर रा.से.यो.चा स्वयंसेवक म्हणून राष्ट्रसेवा करताना नक्की अभिमान वाटेल. देशाच्या प्रत्येक नवतरूणाला हक्काने सांगावंसं वाटतं,
   
     *_उठ तरूणा जागा हो ,NSS चा धागा हो !!_*

या राष्ट्रानेही आपली उज्वल भवितव्याची धुरा रा.से.यो. च्या स्वयंसेवकांच्या मजबूत आणि एकसंध खांद्यावर निश्चिंतपणे द्यायला हरकत नाही. 

        *_उठें समाज के लिये उठें, उठें.._* 
         _जगें स्वराष्ट्र के लिये जगें जगें.._
       *स्वयं सजें वसुंधरा सवॉंर दे |*


      -- तुषार पोपटराव वाघमारे , देवदैठण. 

Comments

  1. Replies
    1. धन्यवाद काशीनाथ.. खूप खूप आभार

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद .. खूप खूप आभार !!

      Delete
  3. Bhawa lay bhari

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद .. खूप खूप आभार !!

      Delete
  4. खूप भारी आहे.👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद !

      Delete
  5. Khup chan ahe bhau

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद भाऊ 😊

      Delete
  6. Mla abhiman vatato bhava tuja
    Kupach chaan
    Mla hi avdel sahbhagi hoyla

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद संकेत 😊

      Delete
  7. तुषार तो पंढरपूर कॉलेजमधला फोटो मी काढलाय.
    मयुर गार्डी

    ReplyDelete
    Replies
    1. होय ! धन्यवाद मयूर. हा फोटो फक्त इथेच राहिलाय, माझ्याकडे save नाहीय.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

समीक्षा - साहित्य आणि साहित्य संशोधनाची सृजनशील वाट

'साहित्यसंशोधन - वाटा आणि वळणे'         पुस्तकाचे लेखक - डॉ. सुधाकर शेलार समीक्षावजा लेख - तुषार वाघमारे          सध्या भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत सामान्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकातून नाराजीचाच सूर ऐकायला येतो. मग ते मूल्यशिक्षणाची तक्रार असेल किंवा मग जागतिक पातळीवर खरा उतरायला तितकासा सक्षम नसणारा भारतीय उच्चशिक्षित व्यक्ती ! 'भारताच्या IIT सारख्या संस्थेत शिकलेले विद्यार्थी पुढे अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये जाऊन जगाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ठेवतात', असं आपण अभिमानाने मिरवत असतो, मात्र त्याच क्षणी PhD मिळवलेला विद्यार्थी भारतात 'सुशिक्षित बेरोजगार' म्हणून का फिरतो ? या प्रश्नाचं उत्तर अजूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेला म्हणा किंवा इथल्या राजकीय नेतृत्वांना देता आलेलं नाहीय. यामध्येच मुद्दा येतो दर्जेदार शिक्षणाचा. शिक्षणाचा दर्जा हा सुद्धा प्रस्तुत प्रश्नाला बराचसा कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे.           हे  सर्व चित्र पाहता डॉ. सुधाकर शेलार यांनी लिहिलेलं 'साहित्य संशोधन - व...

गाव माझा भाग - ३ लालटेन आणि चिमणी

        लालटेन आणि चिमणी             बऱ्याच दिवसांतून गावाकडच्या विसर पडलेल्या पण अजूनही आठवण काढली कि शेकडो गोष्टींची आठवण करून देणाऱ्या काही गोष्टींच्या या मालिकेत आज बऱ्याच दिवसांतून भेटत आहोत. तत्पूर्वी थेट चिंचदर्यात (देवदैठण गावाजवळची ब्राह्मणांच्या अवघ्या तीन चार घरांची वाडी) नेणाऱ्या, पानतासाने गुरं चारताना शुद्ध ब्राम्हणी भाषेत केलेली शिवार भेट आपण अजिंक्यच्या लेखांमधून अनुभवलीच !!       आमच्या वाघमारे वस्ती (देवदैठण आणि हिंगणीच्या शिवेवर वसलेली) वरती यायचं म्हटलं की प्रधानमंत्री योजनेतून झालेली डांबरी सडक तुम्हाला थेट वर्ग एक च्या वातानुकूलित डब्यात बसून गेल्याची अनुभूती देते. होय, नेमकं शहराचं वर्णन करताना गावाकडच्या उपमा द्याव्या लागतात तसं गावाची चुनुकही न अनुभवलेल्या उगवत्या पिढीला आधुनिक शहरी उपमा देनंही भागच. असो हा अनुभव मिळतो तो रस्त्याच्या दोन्ही अंगाला ऊस किंवा हिरव्यागार घासाच्या बागायत रानामुळे गुलाबी हवा म्हणता म्हणता चांगलीच कडकी भरंल अशी थंडी अनुभवायला देतो. वस्तीवरची मायेची ऊब अनुभ...

भयकथा १ - अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई...

अमावस्येची रात्र आणि पांढऱ्या साडीतली बाई सत्य घटनेवर आधारित.. सायकलच्या पॅडलची करकर, मध्येच अंधारात न दिसलेल्या खड्ड्यात सायकल जाऊन वाजणारी घंटी आणि दोघांचीही चूप !  ना रस्त्याकडेला एखादं घर, ना शेतातली दिवाबत्ती, फक्त अंधार आणि अंधारच. अधुनमधुन एखादा माणूस गेल्यावर नातेवाईक जसा आक्रोश करतात तसा अक्राळविक्राळ आवाज काढणारे कोल्हे अंगावर शिरशिरी उठवत होते.           शिंदे (म्हणजे मी स्वतः), बंट्या तांबे (पोंचू) आणि माऊल्या दंडवते (कावळा). तिघांची गट्टी लंय झ्याक. गावात शाळेसमोरच आमचं जुनं घर उभ्या फळ्यांचं बनवलेलं. वर्गातून रस्त्यालगतची ती रूम खिडकीतून दिसेल अशी. इयत्ता १० वी चं वर्ष होतं, त्यामुळे STD मधून TD ने सायकल दामटत लवकर घरी जायचं, दिवस मावळायच्या आत घरचं असेल ते काम उरकून रूमवर हजर व्हायचं. हे नेमानं ठरलेलं. निमित्त अभ्यास असलं तरी, पोरं सोरं एकत्र आल्यावर खंडीभर उद्योग सुचतात.    असो त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत दुपारच्या सुट्टीत बेंच वर बुक्क्यांनी वाजवत चांगला ताल धरला होता. पोरींची रांग शेजारीच असल्याने सोज्वळ...